नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त रेशन धारकांना मिळणार दिवाळी पॅकेज lokpravah.com

 सामाजिक अंतराचे पालन करण्याचे जिल्हा पुरवठा अधिका-यांचे आवाहन



गडचिरोली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत ऑक्टोबर-२०२२ करिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना  गहू, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या चार वस्तुंंचा समावेश असलेला 1 संच (दिवाळी पॅकेज) प्रतिशिधापत्रिका रु.100 प्रतिसंच या सवलतीच्या दराने ई-पास प्रणालीव्दारे वाटप करण्यात येणार आहे.

अंत्योदय  अन्न योजनेअंतर्गत  प्रती  शिधापत्रिका 30 किलो तांदुळ रुपये 3 प्रति किलो प्रमाणे, गहू 5 किलो २ रुपये प्रति किलो प्रमाणे, तर १ किलो साखर २० रुपये प्रति किलो प्रमाणे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती  4 किलो तांदुळ ३ रुपये प्रति किलो प्रमाणे, 1 किलो गहू २ रुपये प्रति किलो प्रमाणे वाटप केला जाणार आहे.

      कोविड-19 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022  करिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरीक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) "मोफत" वाटप करण्यात येणार आहे. सदर योजनेतील ऑक्टोबर 2022 करिता धान्याचे वितरण मंजूर करण्यात आले आहे.  

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्नयोजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला 1 शिधाजिन्नस संच (दिवाळी पॅकेज) प्रतिशिधापत्रिका रु.100 प्रतिसंच या सवलतीच्या दराने ई-पॉस प्रणालीव्दारे  ऑक्टोबर 2022 करिता वाटप करण्यात येत आहे.

  शिधापत्रिकाधारकांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील ऑक्टोबर महिन्यातील नियमित देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची उचल करावी. धान्य घेतेवेळी पीओएस मशीन मधून निघणारे बिल घेवून, बिल पावतीवर नमूद असलेली रक्कम देण्यात यावी. सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची मोफत उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिका-यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments